Wednesday, May 28, 2014

तिने पसरले सारे, काटे माझ्या वाटेवर.
मी पायालाच दगड, बांधून वाट धरली.

प्रेममित्र

Sunday, May 25, 2014

हा म्या हाय बालमजुर,
यात माझा गुन्हा काय?
मलाबी पोट हाय,
पोटाला भुख हाय,
त्यासाठी करतोया मजुरी,
दुसरा कोणता पर्यायबी नाय.

दारुपायी बा गेला.
खचुन खंगुन माय गेली.
बालपणाच्या उंबरठ्यावर,
माय बापाची सावली हरवली.

गरीबी जणु जन्मासोबत,
आंदण आली व्हती.
माय बापाच्या मरणाला,
तीच कारण व्हती.

आता हातावर पोट व्हत.
माथी आभाळाच छत व्हत.
डोळ्यात नव्हत सपान तरीबी,
डोळं कायतरी शोधत व्हत.

त्यारात्री डोळ्यात,
रातच्या भाकरीची,
चिंता साठली व्हती.
आन् मनामध्ये माय बापाची,
आठवण दाटली व्हती.

पोटासाठी मंग,
केली म्या चाकरी.
त्याच पैश्याची,
केली मंग भाकरी.
आन् त्यालाच या समाजान,
बालमजुरी म्हटली.

मला बी वाटतं की,
शाळेत जावं, लय शिकावं.
नसलेल्या त्या माय बापाच,
सपान पुरं करावं.

पण ते कव्हा जमलंच नाय.
या समाजान ते करुचं दिल नाय.
पाठीवर दप्तराचं बोझं देण्यापरिस,
डोक्यावर बालमजुरीचं ओझं हाय.

माह्यासारखं लय जणांच बालपण,
आसंच जळत हाय.
पण या समाजाला त्याचं,
कायबी घेण देण नाय.

सांग तुच आता,
ह्यो कुणाचा गुन्हा हाय?
या सार्याला मी की,
ह्यो समाज जबाबदार हाय.

आसलं जर मी तर,
हा ह्यो गुन्हा मी केला हाय.
चतकोर भाकरीपायी,
बालपण माझं जाळलं हाय.
चतकोर भाकरीपायी
बालपण माझं जाळलं हाय

प्रेममित्र

आहे......

मनोसक्त आज मला, जगायचे आहे.
एकट्यात का असेना, रमायचे आहे.

कुठे मागत बसू, स्पर्श उसना कोणाला?
मलाच माझ्या स्पर्शाने, शहारायचे आहे.

आनंद पावसाचा, नेहमीच घेत आलो,
आसवात माझ्याच ओलेचिंब, भिजायचे आहे.

मनोसक्त आज मला, जगायचे आहे.
एकट्यात का असेना, रमायचे आहे.

प्रेममित्र

Saturday, May 24, 2014

बरखास्त केलीत त्यांनी,
आमची तत्वे.
आमच्या बिनबुडाच्या वैचारिक चौकटीत,
कोंडतो म्हणे,
त्यांचा श्वास.
किळस वाणे वाटते त्यांना,
आमचे उघड्यावरचे जिणे.
खटकते त्यांना,
आमचे वास्तववादी बोलणे.
पांगळे करतो म्हणे आम्ही,
त्यांच्या गोजिरवाण्या साहित्याला.
मग बसा गोंजारत त्याला,
लाली पावडर लावत.
आम्ही अशीच खरडणार,
आमची लेखणी.
भाकरीचा माग काढत,
तुम्ही बांधलेल्या,
स्वार्थी भिंती,
उध्वस्त करत.
आम्ही जळून संपलो तरी चालेल यात.
पण समतेच्या माशालिनी,
उद्याचा परिवर्तनवादी सूर्य,
उगवल्याशिवाय राहणार नाही.

-राहुल सिद्धार्थ साळवे
 — 

Friday, May 23, 2014

कर
उध्वस्त
विचारवंतांच्या
वैचारिक
भिंती...
जाळून
टाक
मोहल्ले
जगण्याची
व्याख्या
शिकावनार्यांचे...
नागड
पाड
त्याचं
पुस्तकातून
चोरलेल
भिकार
भंगार
ज्ञान...
लाव
सुरुंग
त्यांच्या
काल्पनिक
रंगवलेल्या
महालाला...
काढ
कोतळा
हात
घालून
त्यांच्या
तोंडातून
खोटे पणात
सजवलेल्या
मनाचा...
तेव्हाच
दिसून
येईल
अस्तित्व
तुझ....
नाहीतर
काय?
कुत्री
मांजरीही
जगतात
मरतात...
तुही
तसाच
मरशील
निसर्गाच्या
नियमानुसार

जगता...

प्रेममित्र

Thursday, May 22, 2014

किडे मुळाला लागलेत आणि आम्ही फळाला दोष देतोय....काय करू ,सवयच आहे........जे दिसते त्यालाच दोष द्यायची.
माझ्या सारखं शेम्बड पोरगं समाजकारणावर आपल मत जेव्हा मांडत.....माफ करा.....मत नको समीक्षा म्हणतो....उगाच इगोचा ईशु व्हायचा......समीक्षा मांडतो तेव्हा........समाजकारणाची, राजकारणाची आणि खरतर धर्म कारणाची व्याख्या ऐकून विचार पडतो.....एका रात्रीत कस काय कळत रे सार?....कस काय बोध होतो रे एका रात्रीत?.......कशी काय अचानक पोटात कळ आल्यागत अस्तित्वाची जाणीव व्हते ?...........सगळ विचार करायला लावणार.........अर्ध्या हळकुंडात भिजलेल, माखलेल वैचारिक, बौद्धिक नागडे पण दर्शवणार......भयाण अस वास्तव्य........विचार स्वातंत्र, व्यक्ती स्वातंत्राच्या कातड्याचा आधार घेत..............ते सारे मिरवतात ही.........स्वीकृत जाणकारांच्या साच्यात स्वतःला कस बस उतरवून.............मला तर एकच प्रश्न चावतोय........एवढी जर अक्कल आहे यांना तर हे इथे का बसलेत लाळ गाळत?......का हे पडद्या मागचे प्यादे आहेत......?........कि सोशल नेट्वर्किंग चा स्टेटस याचं मोठेपण ठरवतो?..........like coment याचं समाजातल स्थान ठरवत? की खाजवून होणार्या खारुजाच copy rights यांच्या कडे आहे? काय कळेनास झालंय........गैबाने काल ओकलेल विसरतात.......ते तरी आधी पुसावं आणि नंतर बोट घालाव.......घश्यात रे.......वैचारिक गरळ ओकायला............कारण माझ्यासारखे उपट सोंडे.....सुकलेल पण खरडून बघतात.......हे लक्षात ठेवा .........आपल म्हणून सांगतो........नागड्याने आरशाची भीती ठेवावी.......सौंदर्याचे दर्शन तर आंधळ्यालाही होते........बाकी मग ज्याची त्याची मर्जी.........आणि स्टाईल......वैचारिक नागडेपण मिरवण्याची.........जसे मी आता मिरवले.....आरसा झाकून.......बिनधास्त...........कारण माझी अक्कल एवढीच आहे.......माझ्या आरशाने ठरवलेली.

राहुल सिद्धार्थ साळवे

आयुष्य

आयुष्य माझ्यासाठीही कोडेच होते.....इतरांसारखे........पण ..... इतर ते सोडवत गेले.....उत्तराच्या अपेक्षेने.......आणि मी जगत गेलो.......आयुष्याच्या प्रेमात पडून....हाच काय तो फरक.

-फिनिक्स
मला कसे कळेल, महत्व या फुलांचे?
मी काट्यांनाच आजपर्यंत, फुल समजत आलोय.

प्रेममित्र

जिंदगीभर

जिंदगीभर शोधलं माय,
सुख मी जगण्यातल.
पण अखेरपर्यंत नाय घावल गं,
तुह्या फाटक्या पदरातल.

प्रेममित्र