अस्वस्थता मनाची,
घडणाऱ्या...दिसणाऱ्या,
घटनांची...परिस्थितीची.
गर्दीचा वर्दळीचा,
गैरफायदा घेत,
स्त्री स्पर्श सुखाचा,
किळसवाणा आनंद घेणाऱ्या,
सुशिक्षित समाजाची,
दशा पाहून होते,
अस्वस्थता माझ्या मनाची.
स्त्री स्वातंत्र....स्त्री समानता
सारे चव्हाट्यावर आणले जाते.
त्या गर्दीतल्या बाईला सारे कळते.
पण अब्रू...लाज...अस्मिता,
या शब्दात अडकून ती,
मुकुटपणे सहन करते.
तिची आवड....हौस मौज
सारेकाही विचार करून.
कारण समाजाचा दृष्टीकोन,
त्याहूनही भयाण अशी मानसिकता,
ठळकपणे लक्षात घेऊन.
तरी कधीतरी ती आनंदापोटी,
या समाजाची,
बिनबुडाची चौकट तोडून,
हौस मौज करते.
आणि मग,
याच सुशिक्षित समाजाची,
नाहक बळी ठरते.
कारण,
इथे अत्याचार डोळ्याने होतात.
कटू किळसवाणे ऐकायला.
पण होतात.
काही करतात...काही टाळतात.
तर काही फक्त,
बघ्याची भूमिका घेतात.
ना गोंधळ...ना गुन्हा.
ना आक्रोश....ना पुरावा.
सारेकाही अगदी अलबेल.
गर्दीत डोकावून बघा एकदा,
सारेकाही उमजेल.
कधी आपणही या सार्यात,
तेही अगदी तोर्यात.
खोटी मुखवटे,
थोडी शुद्ध भाषा,
आणि टापटीप अश्या कपड्यात.
इतक्या खालच्या थराला गेलेल्या,
या समाजाची लाज वाटते.
आणि मी त्या समाजाचा घटक आहे,
याची किळस वाटते.
लाजीरवाण्याने,
जणू अभिमानाने,
सांगतोय हे सारे,
कारण याचा अंत खूप भयाण आहे.
कारण ही,
भयाण अश्या वादळापूर्वीची,
भयाण अशी शांतता आहे.
कारण ही,
भयाण अश्या वादळापूर्वीची,
भयाण अशी शांतता आहे.
राहुल सिद्धार्थ साळवे
( रंग गहिरे या काव्य संग्रहातून )
No comments:
Post a Comment