Saturday, November 1, 2014

कोण म्हणते रक्त लाल असते म्हणून?
त्या खाणीत त्याचे रंग बदलले,
त्या माणूसरूपी...निरागस,
हिऱ्यांना विचार.
ते काळ।च सांगतील.
त्यांच्या रक्ताचा,
रोज नव्याने तयार होणारा,
प्रत्येक थेंब ना थेंब.

ते सूर्यही काळ। सांगतील.
ते चंद्रही काळ। सांगतील.
इतकचं काय,
ते स्वप्नही काळचं सांगतील.

ते नाहीच करणार मान्य.
की, कोळश्यात हिरा जन्म घेतो.
कारण त्यानेच त्यांचे बालपण जाळले.
अश्रुही काळेच देऊन.

आज रमलेत ते त्याच्यात.
त्या कोळश्यालाच आपली माय,
आणि त्या खाणीला,
आपलं जग मानतात ते.
कारण त्या घुसमटणार्या अंधारात,
त्या कोळश्याने त्यांना भाकरी दिली.
जगायला शिकवलं.
आणि रोज मरायलाही.

आम्ही?
आम्ही काय करू शकणार?
आम्ही वाजवणार,
बालमजूरीचे,
फुटके ढोल.
ते पण मोजक्याच,
बालदिनाचे औचित्य साधून.
तेही लाजेपोटी.
आम्ही फ़क्त वाजवणार.
ते फुटके ढोल.
वाजवणार.
त्यांच्या मेलेल्या निरागसतेचा,
जयघोष करत.
खोट्या आक्रोशा सोबत.
ढां ग ढां ग ढां ग ssssssssss

No comments:

Post a Comment