Saturday, November 1, 2014

खाली या मायचा तडा गेलेला उर.
वर त्या मायची भेगाळलेली पायवाट.
जणू दुःखाची दुःखाशी,
होणारी गळ।भेट,
हृदयाची हजार शक्ले केल्याशिवाय,
राहत नाही.
एकीचा पान्हा दुष्काळ।ने आटलेला.
तर दुसरीचा,
भूकेपायी जळ।लेला.
दुःख दोघींचही सारखंच.
पोटच्या उपाशी लेकराचं.
तेही तुझ्या २१ व्या शतकातील,
हरितक्रांतीच्या जमान्यात.
एकीला द्यायला काही नाही.
तर ,दुसरीला घ्यायला काही नाही.
दोघीही फाटक्याचं.
त्याही समांतर.
पण, तुझ्या मानवी मग्रुरी पुढे,
लाचार नाही झाल्या कधी.
त्यांच कर्तव्य बजावत राहिल्या.
आटलेल्या...जळलेल्या,
पान्हासोबत.
तेही स्वाभिमानानं.
तुला नाय कळ।यची,
मायची कळ.
आणि बळही.
नाय कळ।यचं तूला.
त्यासाठी लेकरु म्हणून जगावं लागतं.
अखेरपर्यंत.
नाळ तुटली तरी.
जगावं लागतं अखेर पर्यंत,
लेकरु म्हणून.
लेकरु होऊंन.
आणि लेकरुच राहून.

No comments:

Post a Comment